तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
‘कल्पवृक्ष’ असलेल्या नारळाला ‘अर्थवृक्ष’ बनवण्याचा ध्यास; रत्नागिरीतून वैज्ञानिक व्यवस्थापन, उत्पादकता आणि मूल्यवर्धनाचा नवा प्रयोग रत्नागिरी : कोकण म्हटले की डोळ्यांसमोर
Read morenews-home
‘कल्पवृक्ष’ असलेल्या नारळाला ‘अर्थवृक्ष’ बनवण्याचा ध्यास; रत्नागिरीतून वैज्ञानिक व्यवस्थापन, उत्पादकता आणि मूल्यवर्धनाचा नवा प्रयोग रत्नागिरी : कोकण म्हटले की डोळ्यांसमोर
Read moreसुवर्ण दागिने घालण्याचे स्वप्न आता अधिक सहज आणि परवडणारे झाले आहे. १९३३ पासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या M.K. Ghare Jewellers ने
Read moreमुंबई : देशातील अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी आज समोर आल्या आहेत. सोने-चांदीच्या दरातील वाढ,
Read moreप्रत्येक यशस्वी व्यवसायाची सुरुवात एका स्वप्नातून होते; मात्र प्रत्येक स्वप्नाची सुरुवात आत्मविश्वासानेच होते असे नाही. १५ ऑगस्ट २०२२ रोजी Ecobabble
Read moreभारतातील वाहन उद्योग सध्या स्थानिक उत्पादन, पुढच्या पिढीचे मोबिलिटी प्लॅटफॉर्म्स आणि अधिकाधिक अत्याधुनिक उत्पादन प्रक्रियांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर, मूळ वाहन उत्पादक आणि टियर-१ पुरवठादारांच्या बदलत्या गरजांना सक्षम पाठबळ देण्यासाठी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या टूलिंग व्यवसायाने आपली अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमता आणि उत्पादन कौशल्ये मजबूत केली आहेत. कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी ८५ टक्क्यांहून अधिक व्यवसाय वाहन उद्योगाशी संबंधित आहे. कंपनी प्रवासी वाहने, दुचाकी, व्यावसायिक वाहने तसेच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील ग्राहकांसोबत काम करत आहे. यासाठी उच्च अचूकतेची टूलिंग उत्पादने पुरवली जात आहेत. सध्या वाहन उद्योगासाठी कंपनी पुरवत असलेल्या ९५ टक्के टूलिंग उत्पादनांची निर्मिती उत्पादनांची निर्मिती भारतातच केली जाते. ही बाब स्वदेशी टूलिंग उद्योगाची क्षमता आणि गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेसारख्या उपक्रमांमुळे देशांतर्गत उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. तसेच पुरवठा साखळी सक्षम आणि स्वावलंबी करण्यावरही भर दिला आहे. त्यामुळे अनेक उत्पादक कंपन्या आयतीवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक स्तरावर साहित्य आणि उपकरणांची खरेदी वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचा टूलिंग व्यवसाय विविध प्रकारच्या आधुनिक ट्रलिंग सोल्यूशन्सद्वारे सहकार्य करत आहे. यामध्ये प्रेस टूल्स, डाय कास्टिंग डायज आणि उच्च अचूकतेच्या टूलिंग प्रणालींचा समावेश आहे. या उपायांमुळे उत्पादक कंपन्यांना उत्पादनक्षमता वाढवणे, दर्जा सुधारणे आणि कामकाज अधिकतेने कार्यक्षम बनविण्यास मदत होत आहे. वाहन उद्योगाबरोबरच कंपनी औद्योगिक यंत्रसामग्री, रेल्वे, मेट्रो रेल आणि संरक्षण उत्पादन या क्षेत्रांनाही सेवा पुरवत आहे. त्यामुळे भारतातील उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर करण्यासाठी कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात आले आहे. गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या टूलिंग व्यवसायाचे प्रमुख पंकज अभ्यंकर म्हणाले, “भारतातील वाहन उद्योग बदलत आहेत. स्वदेशी उत्पादनाला मिळणारे प्रोत्साहन, आधुनिक मोबिलिटी तंत्रज्ञान आणि अधिक लवचिक उत्पादन प्रक्रियेची वाढती गरज यामुळे हा बदल घडत आहे. वाहनांच्या अत्याधुनिक रचना अचूकता प्रदान करत आहेत. दर्जेदार उत्पादन, अधिक उत्पादनक्षमता आणि कमी वेळेत नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी टूलिंगची भूमिका महत्त्वाची बनली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि आधुनिक उत्पादन क्षमतांवर सातत्याने भर देत आहोत. त्याचबरोबर भारताला उत्पादन क्षेत्रात सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्दिष्टालाही आम्ही हातभार लावत आहोत.” उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचा टूलिंग व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करत आहेत. यामध्ये डिजिटल सिम्युलेशन, अडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित देखरेख प्रणाली आणि मोठ्या क्षमतेच्या डाय कास्टिंग आणि कॉन्फॉर्मल कूलिंग सोल्यूशन्स यांसारख्या विशेष उत्पादन तंत्रज्ञानाचाही वापर करत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनाची गुणवत्ता चांगली ठेवणे, उत्पादनक्षमता वाढवणे, कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करणे शक्य होत असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. येत्या काही वर्षांत भारतातील टूलिंग उद्योगात सातत्याने वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाहन उत्पादन, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या गुंतवणूकीमुळे या उद्योगाला चालना मिळणार आहे. याशिवाय अनेक उत्पादक कंपन्या आता स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देत आहेत. नवीन पिढीची उत्पादने विकसित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे विविध उद्योगांमध्ये उच्च अचूकतेच्या अभियांत्रिकी टूलिंग सोल्यूशन्सची मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वाहन उद्योग, रेल्वे, मेट्रो पायाभूत सुविधा, संरक्षण उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढणा-या गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर गोदरेज एंटरप्रायझेस समूह स्वदेशी टूलिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्यावर भर देत आहे. कंपनी आधुनिक आणि उत्कृष्ट उत्पादन प्रक्रियेचा सातत्याने विकास करत आहे. तसेच भारतीय उत्पादन क्षेत्र सक्षम, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनविण्यासाठीही कंपनी काम करत आहे. भारताला जागतिक दर्ज्याचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा कंपनीला प्रयत्न असल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
Read moreपुणे महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लाईटहाऊस प्रकल्पाच्या यशस्वी १० वर्षांच्या प्रवासाचा दशकपूर्ती सोहळा दिनांक २७ जुलै
Read more९२ वर्षांचा विश्वास, परंपरा आणि उत्कृष्टतेची चमक – एम. के. घारे ज्वेलर्स दागिन्यांची खरेदी म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर विश्वास,
Read moreदेशातील सुवर्ण कर्ज (Gold Loans) आणि गोल्ड मेटल लोन (Gold Metal Loans) व्यवहारांवर केंद्र सरकार अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याच्या तयारीत
Read moreमुंबई, ६ जून, २०२६: L’Oréal India ने आज आपल्या सर्वात मोठ्या ‘ब्युटी स्किलिंग सेंटर’ची सुरुवात केल्याची घोषणा केली. हे सेंटर ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) सोबतच्या एका विशेष धोरणात्मक भागीदारीअंतर्गत तयार करण्यात आले आहे. हे केंद्र L’Oréal चा प्रमुख कार्यक्रम ‘ब्युटी फॉर अ बेटर लाईफ’अंतर्गत काम करेल. ही मोठी गुंतवणूक भारताच्या कौशल्य विकास इकोसिस्टममध्ये एक मोठा बदल घडवून आणेल; जी गरजू आणि वंचित घटकातील महिलांना व्यावसायिक कौशल्ये, आर्थिक स्वातंत्र्य आणि शाश्वत उपजीविकेचे मार्ग उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवेल. ४,२६७ चौरस फुटांवर पसरलेले हे सेंटर दरवर्षी सुमारे ३,००० लोकांना प्रोफेशनल हेअरड्रेसिंग, मेकअप आर्टिस्ट्री आणि ब्युटी सर्व्हिसेस यामध्ये प्रशिक्षित करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. सहयोगी स्वयंसेवी संस्था आणि सलोन इंडस्ट्रीसोबत मिळून काम करताना, L’Oréal चा ‘ब्युटी फॉर अ बेटर लाईफ’ कार्यक्रम जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत आणि प्रशिक्षकांसाठी विशेष विकासाच्या सुविधा प्रदान करतो. L’Oréal India चा ‘स्किल इंडिया‘ आणि ‘मेक इन इंडिया‘ प्रति संकल्प L’Oréal India गेल्या ३१ वर्षांपासून भारतात कार्यरत आहे आणि या काळात त्यांनी देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता, या नवीन ‘ब्युटी स्किलिंग सेंटर‘ची सुरुवात हा त्यांच्या याच प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने, L’Oréal India ने आपला पहिला ‘सामाजिक-आर्थिक प्रभाव अभ्यास‘ अहवालही प्रसिद्ध केला, जो भारतीय अर्थव्यवस्थेसोबत कंपनीचे असलेले गहिरे नाते दर्शवतो. पॅरिसमधील इकॉनॉमिक रिसर्च कन्सल्टन्सी Asterès द्वारे Asterès Impact Model (MIA) चा वापर करून केलेल्या या अभ्यासातील मुख्य निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत: कौशल्य विकासाच्या प्रभावाचा पुरावा: गुंतवणुकीवर २५ पट सामाजिक परतावा गेल्या एका दशकात, L’Oréal ने ३.३ मिलियन हेअरड्रेसर्सच्या कौशल्याला नवसंजीवनी दिली आहे आणि आपल्या ‘ब्युटी फॉर अ बेटर लाईफ‘ कार्यक्रमाच्या माध्यमातून ४२,००० महिलांना मदत केली आहे. आज, भारतातील टॉप स्टायलिस्टपैकी जवळपास ६०% महिला आहेत — हा वैविध्य आणि लैंगिक समानतेप्रती L’Oréal च्या वचनबद्धतेचा एक मोठा पुरावा आहे. L’Oréal India चे नॉन–एक्झिक्युटिव्ह चेअरमन असीम कौशिक म्हणाले: “सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रभाव निर्माण करण्याच्या L’Oréal India च्या दृष्टिकोनामध्ये कौशल्य विकास हा नेहमीच मुख्य भाग राहिला आहे. भारतात सौंदर्य उद्योग जसजसा विकसित आणि मोठा होत आहे, तसतशी सेवा, किरकोळ विक्री आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित प्रतिभावंतांची मागणी सातत्याने वाढत आहे. आमचे नवीन ‘ब्युटी स्किलिंग सेंटर‘ महिलांना उद्योगाच्या गरजेनुरूप कौशल्ये, भविष्यासाठी सज्ज क्षमता आणि अर्थपूर्ण करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता दर्शवते — आणि यासोबतच ते भारताच्या सौंदर्य अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्येही योगदान देईल.”
Read moreमुंबईतील सर्वाधिक विश्वासार्ह रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या रुस्तमजी ग्रुपने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टसोबत भागीदारी केली आहे. दि. 7 जून 2026 रोजी उद्घाटन होणाऱ्या या प्रकल्पामुळे जलसुरक्षेत सुधारणा होणे, कृषी उत्पादकता वाढणे आणि 18 गावांमधील जवळपास 1,800 शेतकरी कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. दीर्घकालीन पाण्याची उपलब्धता राहावी या दृष्टीने विकसित करण्यात आलेला उपाय म्हणून हा चेक डॅम पावसाचे पाणी साठवून त्याचे संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हंगामी पर्जन्यमान मुबलक असूनही या प्रदेशात सतत पाणीटंचाई उद्भवते. या समस्येला तोंड देण्यास यामुळे मदत होईल. शाश्वत समाज विकासासाठीच्या आपल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा भाग म्हणून रुस्तमजी महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यातील या परिवर्तनकारी उपक्रमाला पाठिंबा देत आहे. येथे वर्षभर उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यामुळे जीवनमान आणि कृषी विकासावर मर्यादा आल्या आहेत. या धरणामुळे वरच्या दिशेने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पाणी साठवले जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळेल आणि वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढेल. समाजाच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प स्थानिक मालकीभावाला प्रोत्साहन देतो तसेच त्याची दीर्घकालीन शाश्वतता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यात मदत करतो. सुमारे 70.58 लाख रु. च्या एकूण प्रकल्प गुंतवणुकीसह या उपक्रमातून जलविषयक शाश्वत पायाभूत सुविधांद्वारे दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी विकास क्षेत्रातील भागधारक, स्थानिक समुदाय आणि संस्थात्मक भागीदार यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्न दिसून येतात. हा प्रकल्प केवळ तत्काळ पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे, तर या प्रदेशासाठी दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ निर्माण करण्यासाठीदेखील डिझाइन करण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत भाष्य करताना रुस्तमजी ग्रुपच्या मुख्य शाश्वतता अधिकारी श्रीमती नम्रता नुलवाला म्हणाल्या, “अर्थपूर्ण शाश्वततेचा पाया समाजासाठी दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्यात आहे यावर रुस्तमजीमध्ये आमचा विश्वास आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये उपजीविकेची साधने ही नैसर्गिक साधनसंपत्तीशी घट्टपणे जोडलेली असतात. तिथे जलसुरक्षा ही आर्थिक लवचिकता आणि सामाजिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाच्या सक्षम घटकांपैकी एक आहे. कवळे चेक डॅम प्रकल्प हा विकास आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करत व्यवस्थेतील मूलभूत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्यपूर्ण आणि परिणामकेंद्रित हस्तक्षेपांची ताकद दाखवून देतो. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टची रोटेरियन म्हणून सहकार्यपूर्ण आणि उद्देशप्रेरित उपक्रम किती प्रभाव निर्माण करू शकतात हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देऊन रुस्तमजीचे उद्दिष्ट दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्य निर्माण करणाऱ्या लवचिक ग्रामीण परिसंस्थांच्या विकासात योगदान देणे आहे. या उपक्रमातून समाज प्रणीत, विस्तारक्षम आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांद्वारे शाश्वत विकासासाठी असलेली आमची व्यापक बांधिलकी दिसून येते.” या भागीदारीबाबत भाष्य करताना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्ष कु. प्रज्ञा मेहता म्हणाल्या, “कवळे चेक डॅम प्रकल्प हा समाजाच्या विकासासाठी समान उद्दिष्ट आणि दीर्घकालीन दृष्टीकोन घेऊन संस्था एकत्र आल्यास काय साध्य होऊ शकते याचे एक प्रभावी उदाहरण आहे. शाश्वत परिवर्तनाची सुरुवात मूलभूत गरजांची पूर्तता करण्यापासून होते आणि जलसुरक्षा ही आरोग्य, उपजीविका, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाच्या सक्षम घटकांपैकी एक आहे यावर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टमध्ये आमचा ठाम विश्वास आहे. या परिवर्तनकारी उपक्रमासाठी दिलेल्या सढळ, उदार आणि दूरदृष्टीपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही रुस्तमजी ग्रुपचे मनःपूर्वक आभारी आहोत. केवळ जलसंवर्धन उपायसुविधेच्या पलीकडे जात कवळे चेक डॅममध्ये स्थानिक आदिवासी आणि शेतकरी समुदायांसाठी जीवनवाहिनी बनण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प सामाजिक-आर्थिक विकासाला गती देईल, उपजीविका बळकट करेल, वर्षभर शेतीसाठी लागणाऱ्या कामाला पाठबळ देईल आणि भूजल पुनर्भरण व परिसंस्था संवर्धनाद्वारे पर्यावरणीय पुनर्संचय करणात योगदान देईल. रुस्तमजीसोबतची आमची भागीदारी अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिक आहे. हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नाही. लवचिकता मजबूत करण्यासाठी, स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेला समाज प्रणीत प्रयत्न आहे. या उपक्रमाचे हे विशेष महत्त्व आहे. ‘सर्व्हिस अबव्ह सेल्फ’ या रोटरीच्या तत्त्वज्ञानाची आणि जबाबदार विकासासाठी असलेल्या रुस्तमजीच्या बांधिलकीची सांगड घालून या भागासाठी दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्य सादर करणारे सहकार्याचे एक आदर्श मॉडेल निर्माण करण्याचा आम्हाला विश्वास आहे. उद्देशप्रेरित भागीदारी पुढील अनेक पिढ्यांसाठी दीर्घकालीन परिवर्तन घडवू शकते हे दाखवून देत हा प्रकल्प खऱ्या अर्थाने ‘टुगेदर वी राईज’ आणि ‘युनाइट फॉर गुड’ या भावनेचे मूर्त रूप आहे.” अशा उपक्रमांद्वारे, रुस्तमजी समाज बळकट करून, पर्यावरण विषयक जबाबदारीला प्रोत्साहन देऊन आणि भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देऊन बांधकाम व्यवसायाच्या पलीकडे मूल्यनिर्मिती करण्याच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेत आहे.
Read more